माणुसकीचे दर्शन: शेटफळे येथील त्या ५ अनाथ मुलींच्या पाठीशी उभे राहिले 'पाटील बंधू'!
कर्त्या पित्याच्या निधनानंतर उध्वस्त कुटुंबाला अनिलशेठ अन् दादासाहेब पाटील यांच्याकडून मुदत ठेवीचा (FD) भक्कम आधार
क्रांती न्यूज प्रतिनिधी
शेटफळे:
आजच्या धावपळीच्या आणि आत्मकेंद्रित युगातही माणुसकीचा झरा आटलेला नाही, याचा प्रत्यय नुकताच शेटफळे येथे आला. येथील रहिवासी कै. मायाप्पा श्रीरंग कांबळे यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. घरातील कर्ता पुरुष, आधारस्तंभ अचानक गेल्यामुळे संपूर्ण कांबळे कुटुंब उध्वस्त झाले. अशातच मागे राहिलेल्या पाच निष्पाप मुली आणि त्यांचे अंधारलेले भविष्य हा एक भयान वास्तव प्रश्न समाजासमोर उभा राहिला होता.
या कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकीची अनोखी मिसाल पेश करत, नेहमीच समाजकार्यात हिरीरीने पुढे असणारे दादासाहेब पाटील आणि त्यांचे बंधू अनिलशेठ पाटील यांनी या कुटुंबाला धीर दिला. केवळ सांत्वन न करता, या पाचही मुलींच्या भविष्याची होणारी परवड रोखण्यासाठी त्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
मुलींचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, या उदात्त हेतूने दादासाहेब पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या विचाराला अनिलशेठ पाटील यांनी खंबीर बळ दिले. पाटील बंधूंच्या माध्यमातून आज या पाचही मुलींच्या नावावर बँकेत प्रत्येकी ७,००० रुपयांची मुदत ठेव (FD) करण्यात आली. हा एक छोटासा पण अत्यंत मोलाचा मदतीचा हात या अनाथ मुलींच्या पाठीशी उभा करण्यात आला आहे.
आईच्या डोळ्यांतून वाहू लागले कृतज्ञतेचे अश्रू...
बँकेच्या एफडीच्या पावत्या जेव्हा या चिमुरड्या मुलींच्या आणि त्यांच्या माउलीच्या हातात सुपूर्द करण्यात आल्या, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचेच मन भरून आले. पतीच्या जाण्याने हताश झालेल्या त्या माउलीच्या डोळ्यांतून समाधानाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळले. "आजच्या युगातही माणुसकी जिवंत आहे आणि ती पाटील बंधूंच्या रूपाने आमच्या पाठीशी उभी राहिली," अशीच भावना त्या अश्रूंतून व्यक्त होत होती.
हा भावनिक आणि सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा पार पडताना शेटफळे गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये: आनंदराव गायकवाड चेअरमन, अशोक गायकवाड, विशाल गायकवाड, दत्तात्रेय कांबळे, उल्हास कांबळे, आलम कांबळे, संतोष कांबळे यांसह गावातील इतर मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील बंधूंच्या या संवेदनशील कार्याचे मनापासून कौतुक केले.
दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या एका कुटुंबाला पाटील बंधूंनी दिलेला हा आधार संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. संकट काळात 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' हा विश्वास देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, हे अनिलशेठ आणि दादासाहेब पाटील यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.