रेणु देसाई म्हणाल्या, "सशस्त्र दल आणि गुप्तचर यंत्रणांचा आदर ठेवणाऱ्यांनी हा चित्रपट पाहावा"; भगवद्गीतेतील श्लोकाचा केला उल्लेख
मुंबई: सध्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून, या चित्रपटाचे सेलिब्रिटींकडूनही कौतुक केले जात आहे. अभिनेते व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या माजी पत्नी व अभिनेत्री रेणु देसाई यांनी सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ चित्रपटाचा आढावाच दिला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आपला अभिमानही व्यक्त केला आहे.
रेणु देसाई यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, जे लोक सशस्त्र दल आणि गुप्तचर यंत्रणांचा आदर करतात, त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. देशाबद्दल बेजबाबदारपणे बोलणाऱ्यांसाठी हा चित्रपट बोधप्रद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी भगवद्गीतेतील अध्याय २, श्लोक ४७ चा परिच्छेद उद्धृत करत ‘कर्तव्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे, यशाची आशा बाळगू नये’ असा संदेश दिला आहे.
याशिवाय, रेणु देसाई यांनी एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘धुरंधर २’ मधील एक क्लिप आहे. या क्लिपमध्ये ‘हा चहावाला भारतात आल्यापासून आमच्या लोकांमध्ये भीती वाढली आहे’ असे संवाद आहेत. ही क्लिप शेअर करताना रेणू देसाई यांनी ‘भाजप आणि आमचे अद्भुत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कट्टर अंधभक्त असल्याचा अभिमान आहे’ असे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट आणि स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.