सोलापूर : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळालं तरी साताऱ्यात कुटुंबीयांचा पराभव झाल्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा गौप्यस्फोट केला.
"मला गुंड म्हणणारे खरे गुंड"
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या "गुंड" टिकेवर गोरे म्हणाले, "जे मला गुंड म्हणतात, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली. राम सातपुते यांच्यावर हल्ला होईल आणि हत्या होईल असा कट होता. पोलीस तपास करतील, कोण गुंड आहे हे समोर येईल."
सातारा पराभवावर भाष्य
"पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष असल्याने साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं, पण ते एकमेव कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं - पराभव अंतिम नाही, सातत्य हवं," असं गोरे म्हणाले.
अजित पवार अपघातावर
रोहित पवारांच्या मागणीनुसार, "बारामती विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. ब्लॅक बॉक्स मिळाला, सुरक्षा एजन्सी निर्णय घेतील."
पक्षांतर्गत टीका
"भाजपचं यश काहींना पचलं नाही. पक्षापेक्षा आम्ही मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण कार्यकर्ते उभे राहिले," असं गोरे म्हणाले. सोलापूरमध्ये भाजपचं यश संघटनेचं असल्याचं सांगितलं.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.